
जनता काही सांगत असते.त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं -अजित पवार यांचा जाधवांना सल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच चिपळूण दौऱ्याच्या वेळी विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना टोला हाणला आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं.
“आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते.त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. तिथली परिस्थिती नेमकी काय झालेली आहे. हे मला माहिती नाही. मी पण भास्कर जाधव यांना ओळखतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलंय. आम्ही एकत्र मंत्रिमंडळात होतो. त्यांनी असंही स्टेटमेंट केलं आहे की, ते त्यांच्या घरातील नातेवाईक होते. लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेले तर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहीजे.”, असं अजित पवार यांनी सांगितलं
www.konkantoday.com