
कोकणात होणाऱ्या दोन मोठ्या प्रदूषण विरहित प्रकल्पाला विरोध करू नका, अन्यथा रोजगार नाही म्हणून दोष देऊ नका उदय सामंत यांचे कोकण वासियाना आवाहन.
कोकणात रत्नागिरी येथे दोन मोठ्या इलेक्ट्रॉनिक प्रकल्पांच्या मान्यतेनंतर आता देशातला व कोकणातला सगळ्यात मोठा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प रत्नागिरीत होणार आहे. अशी मोठी घोषणा पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. सामंत म्हणाले, सगळ्या प्रदूषणविरहित प्रकल्पांचा स्वागत करायला हवे, इतके मोठे उद्योगपती आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी येत आहेत. कोकणात इतके मोठे प्रकल्प पहिल्यांदा येत आहेत. या सगळ्या प्रकल्पांचे स्वागत करायला हवं, ते जर का परत गेले तर मग बेरोजगारीला कोणी दोष ठेवू नये, असा शब्दात उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या द्वारा देशाच्या सुरक्षेसाठी असलेल्या डिफेन्स कल्चर प्रकल्प होत आहे सगळ्यात महत्त्वाचा धीरूभाई अंबानी त्यांच्या नावानं रत्नागिरीमध्ये होत आहे अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. हा प्रकल्प देशासाठी व कोकणासाठी भूषणावह असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी एक हजार एकर जागा या कंपनीला देण्याचा निर्णय झाला आहे. डिफेन्स क्लस्टर प्रकल्प रत्नागिरी येथे उभा राहत आहे. यातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत यासाठी दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे कोकणात रत्नागिरी येथे दोन मोठ्या इलेक्ट्रॉनिक प्रकल्पांच्या मान्यतेनंतर आता देशातला व कोकणातला सगळ्यात मोठा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प रत्नागिरीत होणार आहे.शुक्रवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आयटी क्षेत्रातील दोन इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना मंजुरी देण्यात आले आहे. १९ हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी रत्नागिरी येथील स्टरलाईटची जागा गेली पंचवीस वर्ष पडून होती. हीच जागा या कंपनीसाठी देण्यात आली आहे. २० एकर जागा ही टाटाच्या ट्रेनिंग सेंटरला दिले आहे. नव्याने मंजूर झालेली आहे या कंपनीला तीन वर्षे उभे राहण्यासाठी लागतील यासाठी यातून येथील स्थानिक व्यवसायिकांनाही यांनाही मोठं काम मिळणार आहे. या कंपनीकडून येथे असलेल्या टाटा कंपनी बरोबर सामंजस्य करार करून अडीच हजार युवकांना प्रशिक्षण दिले जाईल अशी ही माहिती उदय सामंत यांनी दिली. हे दोन्ही प्रकल्प व प्रदूषण याचा सुतारमही संबंध नाही आणि असं कोणाला वाटत असेल तर आम्ही यासाठी रत्नागिरी मध्ये एक प्रेझेंटेशनसाठी टीम ठेवत आहोत त्यामुळे प्रत्येक वेळी प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना सामंत यांनी चांगले सुनावले आहे