रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पानवल धरणाला पन्नास टक्के गळती ,दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या पानवल धरणाला आता पन्नास टक्के गळती लागल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्या दुरुस्तीसाठी अद्याप प्रस्ताव पाठवण्याचे ठरवण्यात आले असून ही दुरुस्ती झाली नाही तर
मुख्य जलवाहिनीवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची दुरवस्था झाली आहे. धरणाला ४० ते ५० टक्के गळती लागल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुढे आली आहे. धरणाच्या दुरुस्तीचा ठराव करून पाटबंधारे विभागा याचा प्रस्ताव तयार करणार आहे.मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून या धरणाच्या दुरुस्तीला भरीव निधीची मागणी करू, असे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले. सभागृहात एकमताने तसा ठराव घेण्यात आला.
पावसाळा आणि निम्म्या उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा करण्यामध्ये या धरणाचा मोठा वाटा आहे. शिळ धरणाचा पाणीसाठा त्यामुळे काही महिने स्थिर राहातो. धरण बांधल्यापासून आजपर्यंत पानवल धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही किंवा त्याची मोठी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या धऱणाला सुमारे ५० टक्के गळती लागली असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सर्वसाधारण सभेत दिली. यापूर्वी या धऱणाची मुख्य जलवाहिनी बदलण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २५ ते ३० लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणाची दुरुस्ती झाली तर ठीक नाही तर जलवाहिनीचा काहीच फायदा होणार नाही. हा खर्च फुकट जाईल, असे साळवी यांनी स्पष्ट केले.त्यामुळे लवकरच पानवल धऱणाच्या दुरुस्तीच्यादृष्टीने पावले टाकली जाणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button