शेती नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

ऑक्टोबर महिन्यात आलेल्या वादळामुळे झालेल्या पावसात गर्वे निमगरवे भात शेती व तत्सम पिके यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून विहित नमुन्यात अहवाल 2 नोव्हेंबर पूर्वी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत
तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक यांनी संयुक्त पाहणी करावी नुकसान झालेल्या भात शेती व इतर शेतीचे सातबारा तलाठ्यांनी तत्काळ उपलब्ध करून द्यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केले यानुसार नुकसान झालेल्या भागात संयुक्त पाहणी करून झालेल्या नुकसानाची माहिती विहित नमुन्यात कोणत्याही परिस्थितीत दोन नोव्हेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश या लेखी आदेशात देण्यात आले आहेत या आदेशानुसार तात्काळ भात शेती व इतर पिकांच्या नुकसानीचे पाहणी करण्याचे काम जिल्ह्यात सर्व ठिकाणी सुरू झाले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button