कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा आहे, परंतु संपाला नाही, प्रवाशांचे हाल थांबवा, -विविध प्रवासी संघटनांचा इशारा

राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही.
त्यातच रेल्वे गाडय़ांना असलेली प्रतीक्षायादी, खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून होणारी लूट यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. प्रवाशांचे हाल होत असल्याने राज्य सरकार, विरोधी पक्ष, एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्याही भूमिकेवर प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा आहे, परंतु संपाला नाही, असेही स्पष्ट करतानाच प्रवाशांचे होणारे हाल थांबवा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा राज्यातील विविध प्रवासी संघटनांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button