एसटी संपाबाबत तोडगा निघण्यासाठी रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांचे पांडुरंगाला साकडे

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु आहे.
जो पर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन चालूच ठेवण्याची शपथ रत्नागिरीतील आंदोलक कर्मचार्‍यांनी घेतली आहे.
आज, सोमवारी सकाळी एसटी कर्मचार्‍यांनी विभागीय कार्यालय येथे कार्तिकी एकादशी निमित्त विठूरायाची पूजा व आरती करुन आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्यात यासाठी विठूरायाला साकडं घातले. तसेच पांडुरंगाचा जयघोष केला.
एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, संपाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या बैठका सुरु आहेत. मात्र, यावर अद्याप तरी तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यावर ठाम आहेत. शासनाकडून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button