
कोयना अवजलातील ६७.५० टीएमसी पाण्यापैकी पन्नास टीएमसी पाणी उत्तरेकडील खोऱ्यात वळवले तर त्यामधून रत्नागिरी जिल्ह्याला ४२.९१ कोटी रुपये उपकरापोटी मिळतील-अभियंता वैशाली नारकर
कोयना अवजलातील ६७.५० टीएमसी पाण्यापैकी पन्नास टीएमसी पाणी उत्तरेकडील खोऱ्यात वळवले तर त्यामधून रत्नागिरी जिल्ह्याला ४२.९१ कोटी रुपये उपकरापोटी मिळतील. अवजलातील १७.५ टीएमसी पाणी वापरासाठी छोटे प्रकल्प उभारता येतील.त्यासाठी या निधीतील चाळीस टक्के रक्कम खर्च करता येऊ शकते. त्यादृष्टीने विचार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पाटबंधारे महामंडळाच्या अभियंता वैशाली नारकर यांनी केले.
रत्नागिरीत आयोजित जलपरिषदेच्या निमित्ताने सादरीकरण करताना नारकर म्हणाल्या, कोयनेचे अवजल टनेलद्वारे समुद्रात सोडा, अशी मागणी होत आहे; परंतु तसे करण्यापेक्षा अवलजाचे आर्थिक संपत्तीत रुपांतर केल्यास रत्नागिरी जिल्ह्याला फायदा होईल. सगळे पाणी कोकणासाठी वापरावे ही मागणी व्यवहार्य नाही. या पाण्यावर उपसा सिंचन योजना राबविल्यास त्या खर्चिक ठरु शकतात. वाशिष्ठीचे पाणी ३६ गावातील क्षेत्राला वापरण्यात येणार होते. पण तो प्रकल्प खर्चिक असल्यामुळे मागे पडला. सध्या कोकणाचा जल आराखडा तयार झाला आहे.
www.konkantoday.com