जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमारी नौका वरील एका खलाशाचा मृतदेह हाती

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून पाच दिवसांपुर्वीमच्छीमारीसाठी गेलेली बोट अद्यापही परतली नाही. त्याबोटीवरील सहा खलाशांपैकी एकाचा मृतदेह गुहागरकिनाऱ्यापासून २० नॉटीकल खोल समुद्रात आढळून आल्याचेजयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जे.
एच.कळेकर यांनी दिली. खलाशाचा मृतदेह सापडल्यामुळे ती बोट
समुद्रात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेपत्ताबोटीचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागलीआहे.अनिल आंबेरकर (वय ५०, रा. साखरी आगर-गुहागर) असेमृतखलाशाचे नाव आहे. पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या त्या
बोटीचा । कसून शोध जयगड पोलिस यंत्रणा करत आहे. याबोटीवर बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल,अनिल आंबेरकर, गोकुळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे
आदींचासमावेशआहे.नासिरहुसेनमिया संसारे यांच्यामालकीची ‘नावेद ‘ ही मच्छीमारी बोट २६ ऑक्टोबरला जयगडबंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली होती. ही बोट २८ऑगस्टला जयगड बंदरात येणे अपेक्षीत होते; मात्र ३०तारखेपर्यंत ही बोट जयगड बंदरात परत आली नाही. त्याबोटीशी संपर्कसाधण्याचाहीप्रयत्नकरण्यात आली होती. तक्रारदाखल झाल्यानंतर बोटीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले हाेते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button