
कुत्र्यांना अन्नात विष घालून मारल्याचा संशयावरून अटक केलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला जामीन मंजूर
रत्नागिरी शहरातील २१ कुत्र्यांना अन्नात विष घालून मारल्याचा संशयावरून अटक केलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केले, त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाला.शहरातील तब्बल २१ कुत्रे एकाच दिवशी मृत झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी
रत्नागिरी नगर परिषदेचा माजी कर्मचारी सिद्धार्थ गोविंद कदम ( राहणार मारुती मंदिर रत्नागिरी) याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. शुक्रवारी त्याला न्यालायत हजर केले असता त्याला जामीन मंजूर झला.
www.konkantoday.com