
कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे अर्ध्या महाराष्ट्रावर पावसाचे ढग
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे अर्ध्या महाराष्ट्रावर पावसाचे ढग दाटले आहेत. पुढील दोन-तीन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सोमवारी विदर्भ आणि मराठवाडय़ात तर मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सोसाटय़ाच्या वाऱयांसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पावसाचे ढग आणि सोसाटय़ाचा वारा सोबत घेऊन ‘गुलाब’ चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. वाऱयाचा वेग भयानक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पुलाबा वेधशाळेच्या हवामान तज्ञ डॉ. शुभांगी भुते यांनी केले आहे.
मुंबईत या वादळाच्या प्रभावाने सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
www.konkantoday.com