
भविष्यात मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईहूनथेट सिंधुदुर्गला केवळ साडेतीन तासांत जाता येणार
राज्य शासनाने नुकताच मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) या प्रकल्पाची घोषणा केली आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना वरळी उन्नत मार्गावरून थेट सिंधुदुर्गला केवळ साडेतीन तासांत जाता येणारआहे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा बृहत् आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या तसेच सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात झाली असून पुढील दोन वर्षांत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे.
सध्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम रेंगाळले आहे मुंबईतून कोकणात जाण्यासाठी सध्या वाहनचालक आणि प्रवाशांना कसरतच करावी लागते. महामार्गाचे काम रखडल्याने हा प्रवास आणखी त्रासदायक होतो. अशा वेळी भविष्यात तयार होणारा हा कोकण द्रुतगती मार्ग मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास सुकर करणारा ठरणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाल्याबरोबर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वर्षभरात आराखड्याचे काम पूर्ण करून प्रकल्पाला आर्थिक, प्रशासकीय मंजुरी आणि इतर सर्व प्रकारच्या परवानग्या घेत पुढील दोन वर्षात प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. काम सुरू झाल्यापासून चार ते पाच वर्षांत ते पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असून २०२७-२८ मध्ये हा द्रुतगती मार्ग वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे मुंबईला जाण्यासाठी च्या अंतर कमी होऊन या जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे
www.konkantoday.com