रत्नागिरी शहरातील निवखोल येथे रिक्षा-दुचाकी अपघातात तिघेजण जखमी.

रत्नागिरी शहरातील निवखोल येथे रिक्षा-दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात रिक्षाचालक व दुचाकीवरील दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालक संदेश बोरकर, दुचाकीवरील बशीर फणसोपकर (५९) व अच्युत वासुदेव आगाशे (रा. निवखोल-रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. बशीर फणसोपकर हे २२ नोव्हेंबरला दुचाकीने (एमएच ०८/यू-७८५६) निवखोल येथून येत होता. दुपारी २ च्या सुमारास संदेशच्या ताब्यातील रिक्षाचा पुढचा टायर फुटला. त्यावेळी ताबा सुटलेली रिक्षा समोरून येणार्‍या बशीरच्या रिक्षाला धडकली, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button