
खासदार श्री.विनायक राऊत यांच्या मागणीनुसार चिपळूण तालुक्यातील पुरग्रस्तांना श्री.साईबाबा संस्थान, विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्याकडून ५ कोटी रुपये “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”मध्ये मदत…
रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव, मा.श्री.विनायकजी राऊत यांनी चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याकरिता शिवसेना पक्षातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मार्फत, विविध संस्थामार्फत पुरग्रस्तांना लागणाऱ्या अन्नधान्य, पाणी, कपडे, गॅस, शेगडी, चटई, चादर, भांडीसेट, महिलांसाठी आवश्यक साहित्यापासून ते विमा, शासनाकडून आर्थिक मदत व साहित्य मोठ्या प्रमाणात चिपळूणवासियांना मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलुन आम्ही या कठीण प्रसंगात तुमच्या सोबत आहोत याची ग्वाही दिली आहे.
त्याअनुषंगाने श्री.साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्याकडे चिपळूण पुरग्रस्तांना सहकार्य करण्याची मागणी खासदार श्री विनायक राऊत यांनी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री.शिर्डी संस्थानाने नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी *”मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मध्ये ५ कोटी रुपये देणेबाबतचा निर्णय समितीच्या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे असे खासदार श्री विनायक राऊत यांना पत्राव्दारे कळविले आहे.
www.konkantoday.com