गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणांची लगबग सुरू

गणेशोत्सवानिमित्त कोकणात रस्तेमार्गाने जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणांची लगबग सुरू आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात पाच दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा करोना रुग्णसंख्या कमी आहे तसेच निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे कोकणात एसटी, खासगी बस आणि चार चाकी वाहनाने जाणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु मुंबई ते गोवा महामार्गाची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. खालापूर टोल नाक्याजवळ, पेण, वडखळजवळ आणि पुई पुलाजवळही मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. याशिवाय नागोठणे, इंदापूर, महाड मार्ग, कशेडी घाटातही खड्डे असून चिपळूणजवळ चार पदरी रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने तोही वाहनचालकांसाठी तापदायकच आहे. महाड आणि चिपळूण हद्दीत रस्त्यांवर चिखलही आहे. येथील खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणांनी काम सुरू केले आहे. मुंबई ते गोवा मार्गावर वाहतूक हाताळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावर ८ ते १० सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबरला अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान (ठाणे परिक्षेत्र) यांनी दिली. तसेच गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनाही ८ सप्टेंबर ते २० सप्टेंबपर्यंत बंदी असेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button