
नगर परिषदेने ईएमआर मीटर बसवावेत ,माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांची मागणी
रत्नागिरी नगर परिषदेच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजना चोवीस बाय सात आकाराची होणे आवश्यक आहे त्यासाठी लागणाऱया ईएमआर मीटरची तरतूर टेंडरमध्ये केलेली नाही त्यामुळे या मीटरची तरतूद तातडीने करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुख्याधिकारी यांचेकडेकडे निवेदन देऊन केली आहे
हा मीटर बसवला तर पाणी मोजण्याची अचुकता वाढणार आहे त्यामुळे नागरिकांना चोवीस तास पाणी देणे शक्य होणार आहे नागरिकांना चोवीस तास पाणी दिल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा वापर कमी होणार आहे त्यामुळे पालिकेचा फायदा होणार आहे या योजनेचे काम संथगतीने चालू असून फक्त वीस टक्केच काम झाले असल्याचे यांनी निवेदनात म्हटले आहे मुख्याधिकाऱयांना निवेदन देताना संतोष खडपे, सचिन लांजेकर आदीजण उपस्थित होते
www.konkantoday.com