
पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस तीन दिवसांपासून सक्रीय झाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली. मात्र, आता राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.गेल्या चार दिवसांपासून पाऊस आणखी सक्रीय झाला होता. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. तसेच नदी-नाल्यांना पूर देखील आला होता. मात्र, आता पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com