
सरकारने आमचा अंत पाहू नये : धनगर समाज युवा नेते अमृत गोरे अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणीला रत्नागिरी धनगर समाजाचा पाठिंबा
रत्नागिरी : धनगर समाजाने अनुसूचित जमातीत (एसटी) आरक्षण देण्याच्या मागणीला रत्नागिरी धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा रत्नागिरी धनगर समाजाचे युवा नेते अमृत गोरे आणि युवा नेते समीर आखाडे यांनी दिला आहे.सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. एकीकडे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असेल दुसरीकडे धनगर समाजानेही अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा अवलंबला आहे. काही ठिकाणी शेळ्या मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावर उतरला असून या आंदोलनाला रत्नागिरी धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.रत्नागिरी धनगर समाज त्यांच्या पाठिशी असून, आरक्षणाबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा जिल्हाभरात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा अमृत गोरे आणि समीर आखाडे या युवा नेत्यांनी दिला आहे.