महाआवास अभियांनांतर्गत राजापुर तालुक्यात ६७२ घरे मंजूर, सहाशे घरांचे काम पूर्ण
महाआवास अभियांनांतर्गत राजापुर तालुक्यातील ६७२ घरे मंजूर झाली असून त्यातील सहाशे घरांचे काम पूर्ण झाले आहे तर ७२ घरे प्रगतीपथावर आहेत. या अभियानांतर्गत महाआवास अभियान पुरस्कार २०२०-२१ तालुकास्तरीय पारितोषिक समारंभ सोहळा आ. राजन साळवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणार्या विविध योजना गतीमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर ते पाच जून २०२१ या काळात महाआवास अभियान ग्रामीण भागात राबवण्यात आले. राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुलांचा प्रस्तावांना मान्यता देवून या शंभर दिवसात आठ लाख ८२ हजार १३५ घरकुले मंजूर झाली. यामध्ये जिल्ह्यातील ६७२ घरकुलांचा समावेश आहे. www.konkantoday.com