
रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योगाला उभारी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची भेट
रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योगाला उभारी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची दि. २४ ऑगस्टला रत्नागिरीत भेट घेणार असल्याची माहिती काजू प्रक्रियाधारक संघाचे जिल्हाध्यक्ष विवेक बारगीर यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात ३८८ काजू प्रक्रियाधारक कार्यरत असून मोठ्या प्रमाणात काजू बीचे उत्पादन करणारे शेतकरी बांधव आहेत.
या माध्यमातून ३० ते ३५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या काही वर्षात काजू कारखानदार, शेतकरी यांचा पाठिंबा नसल्याने रोजगाराचा आलेख हळुहळू कमी होवू लागला आहे. ना. राणे जिल्हा दौर्यावर येत आहेत. प्रलंबित मागण्यांचे निवेदन ना. राणे यांना यावेळी दिले जाणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात काजू बीचे उत्पादन केले जाते. कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा होतो. बरेचसे प्रक्रिया उद्योग आजारी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील काजू बी परराज्यात जाते. आजारी उद्योगांना बळ मिळावे, या उद्देशाने ना. राणे यांची सदिच्छा भेट घेतली जाणार असल्याचे विवेक बारगीर यांनी सांगितले.
www.konkantoday.com