मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा जहाजाचे लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे


निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून रत्नागिराच्या मिऱ्या किनारी गेली सहा वर्षे लाटांचा मारा खात एकाच जागी अडकून पडलेल्या ‘बसरा स्टार’ जहाजाचे दोन तुकडे झाले आहेत. किनाऱ्यावर सातत्याने होत असलेल्या अजस्त्र लाटांच्या माऱ्याने जहाजाला मध्यभागी मोठे भगदाड पडले. सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमामुळे हे जहाज विशेष प्रसिद्ध झाले होते.

मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावर टेकलेले बसरा हे जहाज काढण्यासाठी मेरिटाईम बोर्डामार्फत त्या जहाजाच्या मालकाला येथील प्रशासनस्तरावरून मुदतही देण्यात आली होती. ती मुदत टळून गेलेली असतानाही ते जहाज काढण्यासाठी अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन या भंगारात गेलेल्या जहाजी विनाविलंब मोडणी करण्यासाठी गुंतलेले होते. मिऱ्या बंधाऱ्याचा १२०० मीटरचा पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामा टप्पा शिल्लक आहे. त्या बंधाऱ्याच्या कामात या अडकलेल्या जहाजा व्यत्यय निर्माण झाला आहे.
मिऱ्या धुपप्रतिबंधक बांधण्याचा पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. त्या कामासमोर अडकलेल्या त्या बसरा स्टार जहाजी मोठी अडचण उभी आहे. हे जहाज आता भंगारात गेल्याच्या स्थितीत उभे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे भंगारात गेलेले जहाज येथील पर्यटनाचे केंद्र बनले होते. कारण त्या जहाजाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पडणाऱ्या रिल्समुळे ते जहाज पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटकांची दरदिवशी तेथे वर्दळ वाढलेली होती. त्यामुळे लगतच्या स्थानिकांनाही रोजगाराचे साधन निर्माण झाले होते. पण आता खवळलेल्या समुद्राच्या धडकणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे या जहाजाला मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. त्या जहजाचे दोन तुकडे झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button