देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे -नाना पटोले
देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठय़ा कष्टाने मिळालेले आहे. परंतु स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत भाजप १४ ऑगस्ट हा दिवस स्मृतिदिन म्हणून साजरा करत आहेत हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
www.konkantoday.com