सरकारचं पत्र राज्यपालांकडे गेलं आहे. कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल – शरद पवारांचा राज्यपालांना टोला

राजकारण रंगू लागलं आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेतला जात असताना राज्यपालांनी मात्र, या मुद्द्यावरून खोचक प्रतिक्रिया दिली हाेती या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतील बेलार्ड पिअर येथील कार्यालयात पत्रकार परिषद झाली.
यावेळी शरद पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी १२ सदस्यांच्या मुद्द्यावर विचारणा केली असता शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला. “मी राज्यपालांचं स्टेटमेंट वाचलं. त्यांनी कुणालातरी सांगितलं की सध्याचं सरकार यावर मागणी करत नाही, तुम्ही कशाला करता? उद्धव ठाकरेंचं पत्र यापूर्वीच त्यांच्याकडे गेलेलं आहे. नवाब मलिक स्वत: त्यांना पत्र देऊन आले आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ देखील त्यांना या मुद्द्यावर भेटून आलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “यासंदर्भात सरकारचं पत्र राज्यपालांकडे गेलं आहे. कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. आम्ही आता त्यावर बोलतही नाही. आपल्याकडे म्हण आहे की शहाण्याला शब्दांचा मार. पण शहाण्यांना! त्यामुळे उगीच कुठेही शब्द वाया घालवणं गरजेचं नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button