रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर भागातील रस्ते बनले धोकादायक

नगरपरिषदेचा भोंगळ कारभाराबाबत नागरिकांची नाराजी

रत्नागिरी– रत्नागिरी शहरातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे धोकादायक बनले आहेत. आज सकाळी मुख्य मार्गावरील शिवाजीनगर येथे खड्डे, पाणी आणि दगडांमुळे मुळे अनेक बाईकस्वार घसरून अपघात झाले नगरपरिषदेच्या नावाने दुचाकीस्वार बोटे मोडत आहेत. परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे हे होत आहे नगरपरिषद थातुरमातुर उपाययोजना करून वेळ मारून नेत आहे. पण सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे, असे जनता बोलत आहे.
आज शिवाजीनगर येथे पडणारे दुचाकीस्वार पाहून अपघात टाळण्यासाठी श्री अपार्टमेंट येथील व्यापाऱ्यांनी लोकांना सूचित करण्यासाठी बॅरिकेटस ठेवली आहेत. आता तरी नगरपरिषदेला जाग येईल का, असे बोलले जात आहे.
www.konkanytoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button