नियोजनशून्य कारभार जिथे आढळेल तिथे शिवसेना सत्तेत असते-भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी-
शिवसेनेवर टीका करण्याचे दिवस केव्हाच गेले. खराब रस्ते, अपुर्‍या सोयी सुविधा, अपुरा पाणी पुरवठा, वैद्यकीय क्षेत्रात नियोजनशून्य कारभार असे जिथे आढळेल तिथे शिवसेना सत्तेत असते, ही आता जणू ओळखच राहिली आहे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी साळवी यांनी केलेल्या टिकेला दिले.

दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यावर बंदरकर यांनी टीका केली. त्यानंतर अनिकेत पटवर्धन यांनी प्रत्युत्तर दिले. अनिकेत पटवर्धन यांच्यावर तुषार साळवी यांनी टिका केली. आता पुन्हा अनिकेत पटवर्धन यांनी प्रतिवाद केला असून आता हा विषय आमच्यासाठी संपला आहे. अशा टीकांना उत्तरे दिली जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले आहे.

अनिकेत पटवर्धन म्हणाले, बाकी वडीलकीचा सल्ला नक्की लक्षात ठेवेन. पण मला आता सल्ले देण्यापेक्षा मोठ्या भावाप्रमाणे असलेले मा. अ‍ॅड. दीपकजी पटवर्धन यांनी दाखविलेल्या शहरातील त्रुटींवर लक्ष दिलेत तर जास्त चांगलं होईल. तुम्ही आम्ही ज्या रस्त्यांवरून फिरतो त्यावरील खड्डेही दिसू नयेत इतके बिपीनजी आणि तुषारजी यांनी डोळे बंद करून राहू नये. लहान असलो तरी दिसलेले डोळेझाक करायची सवय नाही. असो सिव्हील हॉस्पिटल, खराब रस्ते यावर एक स्वपक्षीय पत्रकार परिषद घेऊन जनतेला विश्वास द्या इतकेही कमी नाही. पक्षीय अंतर्गत विषयात निदान साळवीनी तरी बोलू नये.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button