
रत्नागिरी विभागात २२२ रात्रवस्तीच्या गाड्या पैकी सध्या अवघ्या ७० गाड्या सुरू
गतवर्षी लॉकडाऊन काळात एसटी वाहतूक बंद होती. मात्र यावीर्षी अत्यावश्यक सेवेंतर्गत वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. अनलॉकनंतर आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत वाहतूक सुरू केली. प्रवासी प्रतिसादानंतर टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातील वाहतूक वाढविण्यात आली. लॉकडाऊनपूर्वी रत्नागिरी विभागात २२२ रात्रवस्तीच्या गाड्या सुरू होत्या. सध्या अवघ्या ७० गाड्या सुरू आहेत. ग्रामीण भागात नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी रात्रवस्तीच्या गाड्या फायदेशीर ठरत आहेत. मात्र शाळा, महाविद्यालयांचे अध्यापन ऑनलाईन सुरू आहे. त्यातच चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू असल्याने व्यवसाय, उद्योगांसाठी वेळेची मर्यादा आहे. ५० टक्के उपस्थितीची अट आहे.www.konkantoday.com