
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भविष्यात करावयाच्या नियोजनासाठी नव्याने दरडप्रवण गावांचे विशेष सर्वेक्षण
रत्नागिरी :नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भविष्यात करावयाच्या नियोजनासाठी नव्याने दरडप्रवण गावांचे सर्वेक्षण करुन घेतले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्हयातील एकूण 45 गावांचा अभ्यास करण्यात आला असून भूवैज्ञानिक मानांकाच्या आधारे उच्च प्रवणतेनुसार I, II, III, IV अशी वर्गवारी करण्यात आली आहे.भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्याकडून अभ्यास करण्यात आलेल्या 45 गावांचा सर्वेक्षण अहवालानुसार सदर ठिकाणचे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुचविण्यात आलेल्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबधित यंत्रणा यांना कळविण्यात आले आहे. तसेच या यादी व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्हयातील भूस्खलन, दरड कोसळणे यामुळे धोकादायक असलेल्या गावांचे सर्वेक्षण करण्याबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक रत्नागिरी व भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथक, पुणे यांना कळविण्यात आले आहे. सदर गावांतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे व कोणत्याही प्रकारे जिवीत हानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तहसिलदार यांनी INCIDENT COMMANDER या नात्याने आवश्यक ते आदेश काढावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वर्ग 1 जास्त धोकादायक गावे मध्ये पाजपंढरी (ता.दापोली), उंवरवाडी, पायरवाडी (शेल्डी) (ता.खेड), गोवळकोट (ता.चिपळूण), ताम्हाणे (ता.संगमेश्वर), मुसळेवाडी (खोरनिनको)(ता.लांजा). वर्ग २ जास्त ते मध्यम धोकादायक गांवे मध्ये कळंबट (राजपूरेवाडी, झिमणेवाडी)(ता.दापोली), देसाईवाडी (मांजरे) (ता. संगमेश्वर), साठरे (ब्राम्हणवाडी) (ता. रत्नागिरी), धोपेश्वर (खांदेवाडी) (ता.राजापूर). वर्ग ३ मध्ये धोकादायक गावे मध्ये बहिरेवाडी (पंदेरी), लोकरण (ता. मंडणगड), हर्णे(राजेवाडी), धाकटीवाडी (आंबवली खु), तेलीवाडी (कर्दे), कडूवाडी(आसूद), मोरेवाडी, शिगवणवाडी (ता. दापोली). बौध्दवाडी (कोतवली), गण्याचा टोक, चिकटेवाडी, मोरेवाडी (जामगे), कोसमवाडी (मांडवे) (ता. खेड). कुडली, काजोळकरवाडी(पोसरी), (ता. गुहागर). नायतवाडी, तिवरे (ता. चिपळूण). आंबेरकरवाडी (कोळंबे), देवळे, शेलारवाडी(बेलारी बु.), मानसकोंड (फेपटेवाडी व किंजळवाडी), कातुर्डी, मधलीवाडी (नारडुवे जोगळेकरवाडी), गवळीवाडी (ता. संगमेश्वर) . भोईवाडी (आगरनरळ), जांभारी (ता. रत्नागिरी). साईबाबानगर (खोरनिनको), दिवळीवाडी, गुरववाडी(हर्दखळे) (ता. लांजा). शिवणे बु.(ता. राजापूर). वर्ग ४ कमी धोकादायक गावे मध्ये निवेवाडी(खोतवाडी), गवळीवाडी (ता. खेड). गोमाणेवाडी (शेंबवणे), मालदेवाडी (ता. संगमेश्वर), कुरंग(गुरववाडी व मधलीवाडी), (ता.लांजा).
५ कोटी ९ लाखांहून अधिक रोख मदत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मृतांच्या वारसांना प्रत्येक 4 लाख मदत देण्यात येणार आहे. या अंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 8 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना विशेष बाब म्हणून प्रत्येक प्रकरणी 1 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. यात आजपर्यंत 19 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. आपत्तीत जखमी झालेल्यांना 1 लाख 53 हजाराचे वाटप झाले. बाधित कुटुंबापैकी 7897 कुटुंबांना प्रति कुटुंब 5000 रुपये याप्रमाणे 3 कोटी 91 लाख 7 हजार रुपये तत्काळची मदत वाटप झाली आहे. आपत्तीत बाधित गावामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे मोफत गहू आणि तांदुळ पुरवठा करण्यात येत असून आजपर्यंत 207 गावातील 5948 कुटुंबांना 594.80 क्विंटल गहू आणि 594.80 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. बाधितांठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. यात ऑनलाईन पध्दतीने आजर्यंत 47699 व ऑफलाईन पध्दतीने 3025 अशा एकूण 50724 शिवभोजन थाळींचे वाटप झालेले आहे.
www.konkantoday.com