संगमेश्‍वरातील आठवडा बाजारातील व्यापार्‍यांकडून उभारण्यात आलेले अडथळे दूर

संगमेश्‍वर आठवडा बाजारात विविध मालाची विक्री करण्यासाठी येत असलेल्या व्यापार्‍यांकडून उभारण्यात आलेले अडथळे अखेर हटवण्यात आले आहेत.संगमेश्‍वरमध्ये बुधवारचा आठवडा बाजार भरतो. बुधवार झाला की काहीजण वर्दळीच्या रस्त्यावरच बांबू व इतर साहित्याचा अडथळा निर्माण करून बिनधास्त पुढच्या बाजारच्या दिवशी व्यापार करायला निघून जातात. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत होता. रात्री लाईट केली की अशा अडथळ्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता. अपघात होवून कायमचे जायबंदी होवून घरी बसावं लागण्याची शक्यता होती. याबाबत रामपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये यांनी आवाज उठविला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button