
ई चलनाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी केली ११ लाखाच्या दंडाची वसुली
रत्नागिरी ः जिल्ह्यातील गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे व वाहतुकीला शिस्त लागावी या हेतूने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी रत्नागिरी शहरात ई चलन प्रणाली सुरू केली. वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते व त्यांच्या सहकार्यांनी ई चलनाच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात अंदाजे ५ हजार २७ केसेस दाखल करून १० लाख ९० हजारचा दंड वसुल केला आहे. वाहतुकीची शिस्त तोडणार्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली आहे.