
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भटकी गुरे कमी होती म्हणून आता घोडे पण आले
रत्नागिरी शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे सध्या वाहनचालकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे शहरातील रस्त्यांवर अनेक वर्ष भटकी व मोकाट गुरांचा त्रास सुरूच आहे त्यात आता नव्याने घोड्यांची भर पडली आहे काल मारुती मंदिर परिसरात असे घोडे रस्त्यात उभे होते.मारुती मंदिर येथील रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात र्वदल चालू असते. अशा वेळी या घोडा या मुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.याला जबाबदार कोण ? वाहतूक पोलिस या कडे लक्ष देतील काय.किवा नगरपरिषद यांनी मालकांचा शोध लावून कारवाई करतील काय ?अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे
www.konkantoday.com
