
अर्जुना नदीवरील पाचल-तळवडे पुलाची दुरूस्ती लवकरच पूर्ण करणार
जिल्ह्यात वादळी वार्यासह गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतीवृष्टीत अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊन मोठे नुकसान झाले आहे.राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पाचल-तळवडे पुलाचा बहुतांश भाग हा पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. दरम्यान हा पूल तात्पुरता दुरूस्त करून पुढील पंधरा दिवसात रहदारीसाठी चालू करण्यात येणार असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. www.konkantoday.com