
रत्नागिरी शहरात पाणीटंचाई मात्र एमआयडीसीच्या धरणात मुबलक पाणीसाठा
जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणी टंचाईचे संकट असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी शहरातही तिच परिस्थिती आहे. परंतु रत्नागिरी एमआयडीसी मात्र याविषयी याला अपवाद ठरली आहे. कोणतीही पाणी कपात न करता पूर्ण क्षमतेने २५ मे पर्यंत पाणी पुरेल एवढा ०.७५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा धरणामध्ये आहे. २५ मे पर्यंत पुरेल एवढा साठा आहे. त्यानंतर परिस्थितीचा विचार करून पाणी कपातीचा निर्णय एमआयडीसीला घ्यावा लागणार आहे.
www.konkantoday.com