
पूरपरिस्तिथी नंतर लहान मुलांना तात्पुरत्या स्वरूपाची काळजी व संरक्षणाची गरज भासल्यास संपर्क करण्याचे बालकल्याण समितीचे आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शहरात / खेड्यात महापुराने हाहाकार निर्माण झाला होता. आता काही प्रमाणात पूर्ववत परिस्थिती निर्माण होत असली तरी अनेक कुटुंबात लहान बालके असल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपाची काळजी व संरक्षणाची गरज भासू शकते.अशा सर्व मुलांच्या पालकांना/सामाजिक संस्थानी जिल्हा बाल कल्याण समिती रत्नागिरी यांना त्वरित संपर्क साधावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा बाल कल्याण समितीने केले आहे. जिल्हा बालकल्याणसमिती रत्नागिरी
अध्यक्ष -अॅड विनया घाग -९८२२९८३६२०
सदस्या-अॅड भाग्यश्री सामंत -९४२२४८६४६३
जिल्हा बाल कल्याण समिती रत्नागिरी कार्यालय ०२३५२-२२०१३७
श्री . प्रदीप मांडवकर-९९७०३८४२८८ www.konkantoday.com