रत्नागिरीत आज शून्य सावली दिवस अनुभवता येणार

रत्नागिरीतील ७ मे रोजी दुपारी सूर्य कमाल प्रकाशित असताना सावली अभाव म्हणजे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.असा दिवस पृथ्वीवर +२३.५ डिग्री आणि -२३.५ डिग्री अंश (किंवा २३.५ डिग्री उ. आणि २३.५ डिग्री द.) अक्षांश दरम्यानच्या ठिकाणी दरवर्षी दोनदा अनुभवता येतो. या दोन दिवशी, सूर्य दुपारच्या (मध्यान्ह) वेळी त्या ठिकाणी अगदी डोक्यावर येतो आणि जमिनीवर मनुष्याची सावलीदेखील पडत नाही.इतर दिवशी रोज दुपारच्या वेळी सूर्य कधीच डोक्यावर नसतो. तो थोडा उत्तरेकडे किंवा थोडा दक्षिणेकडे सरकलेला असतो. पृथ्वीवर +२३.५ आणि -२३.५ अंश अक्षांश दरम्यानच्या ठिकाणांसाठी सूर्याची अवकाशातील क्रांती (सूर्याचे खगोलावरील स्थान सांगणारा एक निर्देश बिंदू) दोनदा त्या ठिकाणच्या अक्षांशाच्या एवढी असते. एकदा उत्तरायणादरम्यान आणि एकदा दक्षिणायनादरम्यान या दोन दिवशी, सूर्य दुपारच्या (मध्यान्य) वेळी अगदी डोक्यावर असतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही. यालाच शून्य सावली म्हणतात. रत्नागिरी येथे ७ मे रोजी हा खगोलीय आविष्कार अनुभवता येणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button