चिपळूणमध्ये महापुराचे पाणी ओसरले असले तरी चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणावर चिखलाचे व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे रस्त्यात अनेक ठिकणी चिखलाचा थर साचले असल्याने ते आता साफ करण्यासाठी खास प्रेशर असणारे टँकर आणण्यात आले असून त्यांच्यामार्फत फवारे मारून स्वच्छता करण्याचे काम सुरू झाले आहे तसेच पुराचे पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सतर्क राहून २० आरोग्य पथके चिपळूण शहरासह आजूबाजूच्या परिसरात कार्यरत ठेवली आहेत. चिपळूणमध्ये औषधसाठ्यासह आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. लोकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, रोगराई पसरणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे डॉ . अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी. १५ आरोग्य पथके शहरी भागात तर ५ आरोग्य पथके ग्रामीण भागात कार्यरत ठेवण्यात आली आहेत. www.konkantoday.com