पावसाळ्यात कुंभार्ली घाटात अवजड वाहतूक बंद ठेवा, माजी सभापती शाैकत मुकादम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

कुंभार्ली घाट नादुरुस्त असल्यामुळे वारंवार अपघात हाेत आहेत. त्यामध्ये जीवितहानीलाही सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक अडचणीची ठरली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून हाेणारी अवजड वाहतूक बंद ठेवून ती अन्य मार्गांनी वळवावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती शाैकत मुकादम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त पुणे येथे झालेल्या शिबिरादरम्यान मुकादम यांनी कुंभार्ली घाटातील धाेकादायक स्थितीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले. भाेर घाटामध्ये ज्या पद्धतीने काम झाले आहे, त्या अधिकाèयांकडून मार्गदर्शन घेऊन कुंभार्ली घाटाची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात यावे.

काेकणामध्ये पावसाळ्यामध्ये दरड काेसळण्याचे प्रकार घडतात. या घाटातही दरडी काेसळणे तसेच संरक्षक भिंत काेसळण्याचे प्रकार घडले आहेत. पूर्वी हा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हाेता. आता ताे राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या गुहागर-विजापूर या महामार्गाचे कामही रखडले आहे. सध्या या घाटात 20-25 टायरची माेठी वाहने धावत असतात. त्यामुळे पावसाळ्यात ती अन्य मार्गाने वळवावीत, अशी मागणी केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button