
गुरुवारी दुपारनंतर गणपतीपुळे समुद्रात पाण्याची पातळी वाढली
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे समुद्राला आलेल्या उधाणामुळे मोठ्या लाटा उसळत होत्या.या उधाणामुळे पाण्याची पातळी वाढून पाणी संरक्षक धक्क्यापर्यंत पोहोचले होते. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील किनारपट्टी भागातही जोरदार लाटा उसळत होत्या. गुरुवारी दुपारनंतरगणपतीपुळे समुद्रात पाण्याची पातळी वाढली होतीwww.konkantoday.com