
विठुरायाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह येणार, फक्त ठराविक व्हीआयपी व अधिकारी मंदिरात उपस्थित असणार
आषाढी यात्रेसाठी आजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील १० गावात संचारबंदीला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील १०गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह येणार असून यावेळी केवळ ४५ ते ५० व्हीआयपी व अधिकारी मंदिरात उपस्थित असणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली
www.konkantoday.com