
कोकणसह अनेक जिल्ह्यांत ४ दिवस अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून इशारा
कोकणसह अनेक जिल्ह्यांत ४ दिवस अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण व कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्राला सोमवारपासून गुरुवारपर्यंत चार दिवस अतिवृष्टीचा इशारादेण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात मात्र पावसाचा जोर कमी राहील.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात अतिवृष्टी सुरू आहे. मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. हा पाऊस अजून चार दिवस वाढणार आहे. १९ ते २२ जुलैपर्यंत मुंबई, कोल्हापूर, पुणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी या आठ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
www.konkantoday.com