आता विद्यार्थ्यांना दाखल्याशिवाय प्रवेश दिला जाणार
एका शाळेतून दुसर्या शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो, मात्र आता विद्यार्थ्यांना दाखल्याशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केले आहेत.
कोरोना काळात बंद पडलेले व्यवसाय आणि बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक पालकांना विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरता आलेले नाही. अनेक शाळा विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नाकारत आहेत. शाळेचा दाखला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुसर्या शाळेत प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. आरटीईच्या चालू वर्षीच्या रिक्त जागेसाठी होणारी पालकांची कसरत संपली आहे.
www.konkantoday.com