मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची केवळ निवडणुकीपुरती आठवण -ओवेस पेचकर

मुंबई-गोवा महामार्गाच्या गेल्या अनेक वर्षापसून रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर जाहीर भाषणामध्ये उल्लेख केला, परंतु निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना कोकणातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाची आठवण झाली आहे. हा निवडणुकीचा केवळ अजेंडा आहे, मात्र मी जनहित याचिकेच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी लढा देतच राहणार आहे, असा विश्‍वास मुंबई हायकोर्टाचे वकील, कोकण प्रादेशिक पक्षाचे संयोजक ओवेस पेचकर यांनी व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत शुक्रवारी जाहीर सभा झाली. या ऐतिहासिक सभेत राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. या वेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासह अन्य पाच मागण्या केल्या. यामध्ये गेली १८ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करावा, अशी अपेक्षा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त केली. परंतु हा निवडणुकीपुरता जुमला आहेे. गेल्या १८ वर्षात याची आठवण कुणाला झाली नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button