खड्डे बुजवा अन्यथा आम्हीच बुजवू, ऍड. महेंद्र मांडवकर यानी नगरपालिकेला दुसऱ्यांदा पत्र देऊन दिला इशारा
शहरातील खड्डे बुजवण्याबाबत मुख्याधिकारी व सत्ताधारी आग्रही दिसत नाहीत. याबाबत तक्रार देऊनही कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे पुढील ८ दिवसात खोदकाम केलेल्या व खड्डे पडलेल्या रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून तातडीने खड्डे भरावेत, अन्यथा रत्नागिरीवासियांची काळजी म्हणून मी आणि मित्रमंडळी स्वखर्चाने धोकादायक खड्डे तात्पुरत्या स्वरूपात डांबर टाकून बुजवणार आहोत. जबाबदार नागरिक म्हणून त्यासाठी जे जे लोक सहकार्य करतील त्यांचे सहकार्य घेणार आहोत, असे निवेदन भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा सचिव ऍड. महेंद्र मांडवकर यांनी दिले आहे.
पालिकेच्या मुख्याधिकार्यांना हे निवेदन दिले. मुख्याधिकार्यांकडे २८ जूनला रामआळी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय, शहरामध्ये विविध कारणांसाठी रस्त्यांच्या केलेल्या खोदकामाबाबत व गटारांबाबत निवेदन दिले होते परंतु आज १५ दिवस झाले तरी पालिकेमार्फत खड्डे बुजविण्याच्या दृष्टीने कार्यवाही झालेली नाही. तसेच माझ्या पत्रास कोणतेही उत्तर दिलेले नाही. लोकांना होणार्या त्रासासंदर्भात पालिका लक्ष घालत नाही.
सोशल मिडियावर रत्नागिरीतील या भयाण परिस्थितीसंदर्भात विविध तक्रारी, आरोप होत आहेत. मुख्याधिकारी म्हणून खरेतर रस्त्यांची पाहणी करून ज्या संस्थेने रस्ते खोदले आहेत, त्यांना किमान तात्पुरते खड्डे भरण्याबाबत सूचना देवून अंमलबजावणी व्हायला हवी होती परंतु पालिकेच्या या वागण्यामुळे नागरिकांची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप ऍड. मांडवकर यांनी केला आहे. तांत्रिक अडचणींमुळे पालिकेमार्फत खड्डे भरता येत नसतील तर ठेकेदाराला नोटीस देऊन अथवा तात्पुरते काम करून घ्यायला हवे होते परंतु आता ८ दिवसांत काही कार्यवाही न झाल्यास आम्ही खड्डे बुजवणार असल्याचे ऍड. मांडवकर यांनीसांगितले
.www.konkantoday.com