कोकणासाठी आपत्ती सौम्यिकरण प्रकल्पाला मान्यता,प्रकल्पासाठी पाच वर्षांत ३ हजार ६३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार

कोकणाला चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना दरवर्षी सामोरे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर होणारे नुकसान टाळता आले पाहिजे; यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आपत्ती सौम्यिकरण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी पाच वर्षांत ३ हजार ६३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button