इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि लेखिका सुधा मूर्तीं कोकणातील निसर्गसौंदर्यावर खूश पण कोकणातील रस्त्याबाबत म्हणतात


इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि लेखिका सुधा मूर्तींनी नुकताच कोकण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोकणाच्या नैसर्गिक सौदर्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. कोकणाच्या दौऱ्यादरम्यान जाणवलेल्या समस्यांवरदेखील त्यांनी भाष्य केलं.कोकण हा स्वर्ग आहे. मात्र, या स्वर्गात जाणारे रस्ते खराब आहेत”, असं मूर्ती यांनी म्हटलं आहे.
“गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये रस्ते चांगले आहेत. त्याचप्रमाणे येथेही चांगले रस्ते तयार केले पाहिजे”, असे मूर्ती यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्गम भागातील बापर्डे येथील श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला त्यांनी भेट दिली होती. यावेळी केलेल्या भाषणात मूर्तींनी महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास झाला पाहिजे, असं म्हटलं आहे. “कोकण ही दिग्गजांची भूमी आहे. येथील लोक शिस्तप्रिय आहेत. या परिसराला निसर्गाचं वरदान आहे”, असेही मूर्ती यावेळी म्हणाल्या.
शाळेतील कार्यक्रमात भाषण करताना मूर्ती यांनी मातृभाषेवर भर देण्याची आवश्यकता बोलून दाखवली. “मराठी ही केवळ भाषा नाही तर ही संस्कृती आहे”, असं मूर्ती यावेळी म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी मराठीसह इंग्रजी भाषेचाही सखोल अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button