
रत्नागिरी-रायगड जोडणारा आंबेत खाडीपुलावरून एस.टी. वाहतूक सुरू करण्याची मागणी
रत्नागिरी-रायगड जोडणारा आंबेत खाडीवरील पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने या पुलावरून एस.टी.ची वाहतूक पुन्हा सुरू करावी अशी मागणी कोकण एस.टी. प्रेमी ग्रुपच्या वतीने दापोली आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. आंबेत पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने दापोली व मंडणगड मार्गावरील मुंबई आणि पुणे मार्गावर जाणार्या एस.टी. फेर्या या महाडमार्गे वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना सुमारे २० ते ४० रुपयांचा भुर्दंड पडत होता. आता पुल सुरू झाला असल्याने या फेर्या पुन्हा मंडणगड, आंबेत मार्गे वळवण्यात याव्यात अशी मागणी कोकण एस.टी. प्रेमी ग्रुपच्यावतीने करण्यात आली आहे.
www.konkantoday.com