मुंबई-गोवा महामार्गावर रहदारी सुरू होताच अपघाताचे प्रमाण वाढू लागले

मुंबई-गोवा महामार्गावर लाॅकडाऊनमध्ये अपघातांचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण घटले होते.
२०१८ मध्ये १३० अपघात झाले, २०० जखमी, मृत्यू २७, तर २०१९ मध्ये १११ अपघात १४४ जखमी, तर १६ लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. २०२० मध्ये ६१ अपघात, जखमी ६२, तर २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. २०२१ मध्ये ३५ अपघात, ३३ जण जखमी व १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर किंवा इतर मार्गावर अपघात होतच असतात सध्या मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने व त्याचे काम अर्धवट असल्यानेही अपघात घडत आहेत रस्ते अपघातात मृत्यू किंवा जखमींची संख्या अधिक असते.
जसेजसे पूर्वपदावर यायला सुरुवात झाली, तसतशी अपघातांची संख्या वाढू लागली आहे.अपघात रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून वारंवार सूचना केल्या जातात अनेकवेळा वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडत आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button