मुबलक लस पुरवली तर राज्याचं संपूर्ण लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल -आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना संकटातून वाट काढायची असेल तर आज लस एकमात्र उपाय आहे. हे सरकारदेखील जाणून आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे. डिसेंबरच्या आधी देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. या बाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, मुबलक लस पुरवली तर राज्याचं संपूर्ण लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल.
दिवसाला १० ते १५ लाख लोकांच्या लसीकरणाची राज्याची क्षमता असून केंद्राने सतत लस पुरवल्यास दोन महिन्यात महाराष्ट्राचे लसीकरण पूर्ण होईल, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button