कुवारबाव येथील उड्डाणपूल रद्द

मिऱ्या-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात शहरानजिकाच्या कुवारबाव येथील बाजारपेठ वाचविण्यासाठी उड्डाण पुल की सर्व्हिस रोड याबाबत येथील व्यापारी व रहिवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र तो संभ्रम अखेर दूर झाला असून कुवारबाव बाजारपेठेतून सध्या असलेल्या मार्गावरील चौपदरीकरणाद्वारे सरळ मार्ग तयार केला जाणार असल्याने महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तयार केला जात असताना या महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये असलेली संपूर्ण कुवारबाव बाजारपेठ अस्ताव्यस्त झाली. या बाजारपेठ परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंधरा मीटर जागा संपादित करण्यात आली. महामार्र्गाचे काम सुरू होते त्यामध्ये आलेली बाजारपेठेतील दुकाने, गाळे आदी हटविण्यात आले. पण हा महामार्ग चौपदरीकरण करताना बाजारपेठ वाविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संभ्रम तेथील व्यापारी व ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला होता. सुरूवातीला त्या बाजारपेठेतून उड्डाणपूल बांधला जाणार असल्याची शक्यता होती. ही बाजारपेठ उध्दवस्त होणार असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी केंद्रीय रस्ते मंत्री ना.नितीन गडकरींपर्यंत धाव घेतलेली होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button