उड्डाण पुलाच्या दुर्घटनेवरून संभाजी ब्रिगेडची हायवे ठेकेदारास समज

दोन दिवसांपूर्वी चिपळूणात मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल वैभवसमोर उड्डाण पुलाच्या पिलरवरून कामगार पडून जखमी झाल्याच्या घटनेनंतर संभाजी ब्रिकेड आक्रमक झाली.पाहणीत असं निदर्शनास आलं की जे कामगार रात्रंदिवस काम करीत असतात त्यांच्याकडे कोणतेही सेफ्टी मटेरियल नाही. साईटवर काम करतेवेळी लागणारे साधे हेल्मेटही कामगारांकडे नव्हते. अशा परिस्थितीत काम करीत असताना दुर्घटना झाली, तर कामगारांच्या जिवावर बेतू शकते. याची दखल घेवून संभाजी ब्रिगेड कोकण संघटक सुबोध सावंत देसाई, संभाजी ब्रिकेड कोकण कार्याध्यक्ष मकरंद जाधव, संभाजी ब्रिगेड रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष सावंत देसाई, पंचायत समिती रिटायर्ड जे. ई. श्री. कादवडर साहेब यांनी महामार्ग ठेकेदार इंजिनिअर श्री. जयंती यास तत्काळ बोलावून घेवून कामगारांना कोणतेही सेफ्टी मटेरियल दिल्याशिवाय काम चालू करू नका, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिगेटींग करा, कामगारांना हेल्मेट, गमबूट दिले गेले पाहिजेत, अशा स्वरूपाच्या सूचना करण्यात आल्या आणि भविष्यात अशी घटना होणार नाही याकडे लक्ष देण्यासंदर्भात समज यावेळी देण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button