
विधान परिषदेच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार व्हावा – राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाचपैकी केवळ एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा आमदार निवडून आला आहे. उर्वरित चार आमदार महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचे आहेत. कार्यकर्त्यांना पाठबळ आणि येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला उभारी मिळावी यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
याबाबतचे लेखी पत्र त्यांनी दिले आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक सन 2019 मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार म्हणून शेखर निकम हे निवडून आले.
www.konkantoday.com