सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडी पुलाच्या माती परीक्षणाचे काम आज शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार


सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकाम करण्यासाठी माती परीक्षण आज केले जाणार आहे. सध्या या प्रश्नावरून ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला आहे यामुळे या परीक्षणाला स्थानिकांचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग बांधण्यासाठी पावले उचलली आहेत. आवश्यक तेथे नवीन खाडी पूल व बाह्य वळण रस्त्यांची बांधकामांना मंजूरी दिली आहे. त्या अनुषंगाने काळबादेवी खाडी येथे पूल उभारण्यात येणार आहे. या ठिकाणाहून पुढील मार्गावरही उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यासाठी ग्रामस्थांबरोबर सकारात्मक बैठक घेण्यात आली होती. परंतु काही कालावधीनंतर याला स्थानिक पातळीवरुन विरोध होऊ लागला आहे. उड्डाणपुलापेक्षा किनाऱ्यांवरुन मार्ग नेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने ठराव व बैठका घेतल्या होत्या काळबादेवी खाडी पुलाच्या माती मात्र आता परीक्षणाचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यालाही ग्रामस्थांचा विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मिळावा अशी मागणी ठेकेदारामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असल्याचे कळते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button